मावळ तालुक्यातील मौजे इंदोरी कुंडमळा या गावातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीवरील असणारा साकव पूल हा दळणवळणाच्या दृष्टीने अडचणींचा ठरत आहे. आसपासच्या गावातील नागरिकांना या पुलावरुन शेतीमालाची तसेच दुग्ध पदार्थांची वाहतुक करावी लागते. परंतु हा साकव पूल असल्याने यावरून फक्त पायी चालणारे, आणि मोटारसायकलला जाता येते. सध्या अस्तित्वात असलेला साकव पूल 30 वर्षांपूर्वी स्व. खासदार अण्णा जोशी यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आला होता. शेजारील 10 ते 12 गावांच्या वाहतुकीचा हाच प्रमुख मार्ग आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वाढत्या लोकसंख्येचा विचार करता हा पूल अपुरा पडत आहे. त्यामुळे शेतीमालाच्या वाहतुकीसाठी येथील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर कामगारवर्ग, नोकरदारवर्ग आणि विद्यार्थी- विद्यार्थीनींना या अडचणीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथे प्रसिद्ध कुंडदेवी मातेचे मंदिर आहे त्यामुळे नेहमीच या मार्गावर भाविकांची वर्दळ असते.
तसेच या पुलाचे काम झाल्याने तळेगाव – चाकण रस्त्यावरील तळेगाव शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील काही प्रमाणात मार्गी लागण्यास मदत होणार आहे त्यामुळे येथे नवीन पूल उभारण्यात यावा अशी ग्रामस्थांची मागणी होती. याच संदर्भात,भारतीय जनता पक्षाचे मावळ तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी केली होती. त्यावर बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी रस्ते विकास सचिवांना प्रस्ताव सादर करण्याची सूचना केल्याने लवकरच नवीन पुलाचे काम मार्गी लागेल असा विश्वास भेगडेंनी व्यक्त केला. ( Minister Ravindra Chavan orders to submit proposal for bridge over Indrayani River at Indori Kundmala )
तसेच आमदार सुनिल शेळके यांनी देखील हा विषय हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मांडला होता.
अधिक वाचा –
– ‘निधी देणार नसाल तर तसं सांगा, जाहीर सत्कार करतो’, तालुक्यातील विविध मागण्यांसाठी आमदार शेळके आक्रमक – व्हिडिओ
– पवना धरणग्रस्तांना न्याय मिळणार कधी? 57 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित, आमदार शेळकेंनी अधिवेशन गाजवलं
– वेदांता-फॉक्सकॉन मुद्द्यावर आमदार सुनिल शेळके विधानसभेत आक्रमक, भरपाई कशी करणार? सरकारला सवाल