Dainik Maval News : आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व श्री क्षेत्र आळंदी येथून संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचे प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन पूर्ण केले असून, त्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली देहू-आळंदी पालखी मार्गाची उच्चस्तरीय पाहणी करण्यात आली.

या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाथरवटकर, देहू व आळंदी नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषद स्तरावरील सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांसह हवेली व खेड पंचायत समितीचे सभापती तसेच विविध स्तरावरील पदाधिकारी, दोन्हीही गट विकास अधिकारी, हवेली पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे, खेड पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास माने, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पाहणी दरम्यान खालील बाबींचा आढावा घेण्यात आला :
– पालखी मार्गावरील विहिरी, बोअरवेल, टँकर भरणा केंद्रे आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता व नियमित क्लोरीनेशन.
– हॉटेल, भोजनालये आणि अन्नविक्री केंद्रांमधील स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी आणि अन्नपदार्थ झाकून ठेवण्याच्या उपाययोजना.
– पालखी मार्गावरील परिसर स्वच्छता, धूर फवारणी, डास नियंत्रण व संसर्गजन्य आजार प्रतिबंधक उपाय.
– वारकऱ्यांसाठी उभारण्यात येणारी तात्पुरती मोफत आरोग्य केंद्रे, आयसीयू सुविधा, जर्मन हँगर, चरणसेवा केंद्रे आणि वैद्यकीय पथके.
– १०८ आणि १०२ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा तसेच एएलएस व बीएलएस रुग्णवाहिकांची उपलब्धता व तत्परता.
– पालखी मुक्कामस्थळी औषधसाठा, प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, आपत्कालीन उपचार व्यवस्था आणि संदर्भ सेवा.
– सार्वजनिक व तात्पुरत्या शौचालयांची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि कचरा व्यवस्थापन.
– नैसर्गिक आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नियंत्रण कक्ष, समन्वय यंत्रणा आणि विभागनिहाय कृती आराखड्याची तयारी.
– पालखी मार्गावरील खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छ परिसर आणि वारकऱ्यांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या नागरी सुविधांची पाहणी.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार ! बुधवारी धरणे आंदोलन
– केतन अग्रवाल हत्या प्रकरण । सिया गोयल, चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी
