वाडिवळेसह नऊ गावांना जोडणाऱ्या इंद्रायणी नदीवरील पुलाचे उद्घाटन ( Inauguration Of New Bridge Over Indrayani River ) आणि लोकार्पण आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. अतिशय युद्ध पातळीवर आणि प्राधान्याने हा पूल उभारण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर एक नवीन प्रशस्त पुल झाल्यामुळे या भागातील विकासाला अधिक चालना मिळणार आहे. त्यामुळे पुलाच्या लोकार्पण प्रसंगी या भागातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून फटाक्यांची आतिषबाजी आणि रोषणाई करुन आनंदोत्सव साजरा केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
जुना पुल कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात पाण्याखाली जात होता. त्यामुळे वाडीवळे, वळक, मुंढावरे, बुधवडी, सांगिसे, वेल्हवळी, नेसावे, खांडशी, उंबरवाडी येथील ग्रामस्थांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटत होता. त्यामुळे शालेय विद्यार्थी, दुध व्यावसायिक, शेतकरी यांचे मोठे नुकसान होत होते. नवीन पुल बांधण्यासाठी 5 कोटी 85 लक्ष इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. निवडणुकीवेळी ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण करु शकलो याचे मनोमन समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया आमदार शेळकेंनी बोलताना दिली. ( Inauguration Of New Bridge Over Indrayani River Connecting Wadiwale Valak Mundhavare Budhwadi Sangise Velhavali Nesave Khandshi Umbarwadi villages Of Maval )
अधिक वाचा –
– लोणावळ्यात शनिवारी होणार ‘इंद्रायणी नदी आणि महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता’, IPS सत्यसाई कार्तिक यांचे नागरिकांना आवाहन । Lonavala News
– ब्रेकिंग! मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 6 तास महामार्ग राहणार बंद, लगेच वाचा
– इतिहासातील सोनेरी पान : वडगावचा ऐतिहासिक तह : ‘पानिपतावरील पराभवाचा वचपा मराठ्यांनी मावळभूमीवर काढला’