Dainik Maval News : पश्चिम बंगाल राज्यामध्ये हिंदू समाजावर सातत्याने होणारे हल्ले, जाळपोळ, धार्मिक द्वेष भावना वाढविणारे प्रकार आणि शासन यंत्रणेचे अपयश हे चिंतेचे कारण बनले असून पश्चिम बंगालचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि मावळ तालुका बजरंग दलाच्या वतीने शनिवारी मावळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चात विश्व हिंदू परिषदेचे पुणे विभाग मंत्री सोमनाथ दाभाडे, जिल्हा मंत्री महेंद्र असवले, प्रांत सहसंयोजक संदेश भेगडे, तालुकाध्यक्ष अमोल पगडे, सहमंत्री आकाश वारुळे, सचिन शेलार, योगेश शेटे, प्रखंड मंत्री बजरंग कांबळे, दर्शन वहिले, भूषण वहिले, अनंता कुडे, अमोल ठोंबरे, किरण आचार्य, योगेश ढोरे, निखिल भांगरे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
- तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कोपरा सभेत सोमनाथ दाभाडे, महेंद्र असवले, राजश्री वाकचौरे आदींनी मनोगत व्यक्त करून, बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला.
पश्चिम बंगालमध्ये वक्फ बोर्ड कायद्याविरोधात होत असलेल्या आंदोलनात हिंदूंना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ले केले जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच तेथील हिंसाचाराची एनआयएमार्फत चौकशी करावी, दोषींना विनाविलंब कडक शिक्षा करावी, तेथील कायदा सुव्यवस्था केंद्रीय सुरक्षा दलाकडे सोपवावी आदी मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयाकडे देण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार