व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

“सण आयलाय गो आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? । वाचा नारळी पौर्णिमा विशेष लेख

लेखातून आपण कोकणातील प्रत्येक कोळीबांधवांसाठी खास असलेला सण म्हणजेच, नारळी पौर्णिमेबद्दल विस्तृत माहिती जाणून घेऊयात.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 8, 2025
in महाराष्ट्र, देश-विदेश, मावळकट्टा
Narali-Poornima

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : नारळी पौर्णिमा म्हटलं की अनेकांच्या ओठांवर येतं ते, ‘सण आयलाय गो आयलाय गो नारली पुनवेचा, मनी आनंद मावना कोलीयचा दुनियाचा’ हे कोळीगीत. खरेतर या गीतांच्या बोलांमधूनच आपल्याला समजतं की, नारळी पौर्णिमा हा सण कोळी समाजाचा असून तो त्यांच्यासाठी अत्यंत खास आहे. श्रावणी पौर्णिमा या दिवशीच कोकण भागात, समुद्रकिनारीलगतच्या प्रदेशात नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आणि त्या किनाऱ्याभोवती असलेला कोकणचा भाग हे महाराष्ट्राला लाभलेले वैभव आहे. यासोबतच कोकणातील सांस्कृतिक वैविध्य यानेही महाराष्ट्राला समृद्ध केलेले आहे. त्यामुळेच या लेखातून आपण कोकणातील प्रत्येक कोळीबांधवांसाठी खास असलेला सण म्हणजेच, नारळी पौर्णिमेबद्दल विस्तृत माहिती जाणून घेऊयात.

मंडळी, वर सांगितल्याप्रमाणे श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. आज शुक्रवार, दिनांक 8 ऑगस्ट रोजी यंदाचा नारळी पौर्णिमा सण आला आहे. ( Narali Poornima Festival Information Traditions Significance In Marathi Kolibandhav and Narli Purnima )

का साजरी केली जाते नारळी पौर्णिमा?
कोळीबांधवांसाठी नारळी पौर्णिमा हा सण अत्यंत महत्वाचा आहे. प्रथा, परंपरा आणि स्थानिक रुढींनुसार या सणाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. पावसाळा सुरु झाला की सर्व कोळीबांधव त्यांच्या होडी, नावा, नौका या किनाऱ्याला बांधून ठेवतात आणि मासेमारी बंद करतात. या काळात समुद्र हा खवळलेला असतो, त्यामुळे खवळेल्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी कुणीही जात नाही. मात्र, नारळी पौर्णिमा म्हणजेच श्रावणी पौर्णिमेला सर्व कोळीबांधव या समुद्राची पुजा करतात.

पावसाळ्यात खवळलेला समुद्र शांत व्हावा, यासाठी प्रार्थना करतात. तसेच, पुढे समुद्राचा कोप होऊ नये, मासेमारी करणाऱ्या किंवा समुद्रात वाहतूक करणाऱ्या कोळी बांधवांच्या जहाजे, नौका या सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत व्हावा, यासाठी कोळी बांधव श्रावणी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करतात. पुजेच्यावेळी समुद्राला सोन्याचा नारळ म्हणजेच नारळाला सोनेरी वेष्ठण लावून तो नारळ समुद्रात अर्पण करतात. म्हणूनच, या सणाला नारळी पौर्णिमा, असे म्हणतात. तसेच, सोन्याचा नारळ अर्पण केल्यानंतर याच दिवशी काही कोळी बांधव त्यांच्या होड्या, नावा घेऊन मासेमारी करण्यासाठी समुद्रातही जातात.

कसा साजरा होतो कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा सण?
कोळी बांधवांसाठी हा सण अत्यंत महत्वाचा असल्याने या दिवशी ते प्रचंड आनंदी असतात. अत्यंत पारंपारिक पध्दतीने हा सण साजरा केला जातो. कोळी बांधव त्यांचा पारंपारिक वेष परिधान करतात. कमरेला रूमाल, अंगात टीशर्ट आणि डोक्याला कोळी लोकांची टोपी असा पुरुषांचा पेहराव असतो. तर, स्त्रिया भरजरी लुगडे परिधान करतात आणि म्हणायला गेलं तर सोन्याने अक्षरशः मढतात. कोळी स्त्रिया कायमच सोन्याचे भरपूर दागिने अंगभर घालतात, हे त्यांचे वैशिष्ट्येच आहे.

नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव त्यांच्या बोटींना रंगरंगोटी करून त्या सजवतात. बोटींना पताका वगैरे लावल्या जातात. त्यानंतर बोटींची पुजा करूनच त्या मासेमारीकरता समुद्रात लोटतात. जसे की कोळी बांधव मासेमारीसाठी समुद्रात जातात, त्यावेळी कोळीण स्त्रिया या धन्याचे रक्षण कर, सागराला खरेतर दर्या देवाला दंडवतच घालतात.

  • नारळी पौर्णिमेचा खास नैवद्य :
    नारळी पौर्णिमेच्या दिवशी खास पद्धतीने नैवद्य बनवण्याची प्रथा आहे. खास नारळाच्या करंजांचा नैवेद्य सागराला आणि बोटीला दाखवण्यात येतो. तसेच, काही कोळी पाड्यांवर रावस माशाचा तळलेला तुकडा देखील या नैवेद्यामध्ये ठेवला जातो. अनेक भागात सर्व पारंपारिक पद्धती पूर्ण झाल्या की कोळी पाड्यांवर पारंपारिक गीते गात मिरवणुका काढल्या जातात. विविध स्पर्धा भरवल्या जातात. तसेच, पारंपारिक गीतांवर नृत्य देखील केले जाते.

नारळी पौर्णिमेचे अनन्यसाधारण महत्व :
तसे पाहाता जगाचा इतिहास पाहिल्यास आपल्याला पुर्व काळापासूनच अधिकाधिक सण हे निसर्गाशी जोडलेले दिसून येतात. त्यातही हिंदू बांधवांचे सर्वाधिक सण हे पर्यावरण आणि निसर्गाशी निगडीत आहेत. नारळी पौर्णिमा हा देखील त्यापैकीच एक सण. आपले संपूर्ण कुटुंब पाठीमागे ठेवून भरसमुद्रात कोळी बांधव मासेमारीसाठी जातो. अशावेळी त्याच्या घरी असणाऱ्या कुटुंबीयांना त्यांची काळजी वाटणे साहजिकच आहे. त्यातूनच धर्म, प्रथा-परंपरा यातून निसर्गाला आणि पर्यायाने समुद्राला, वरुणराजाला आपल्याकडे देव मानले जाते. त्यामुळेच समुद्र म्हणजे दर्यादेवाची आपल्यावर कायम कृपा रहावी. आपल्या कुटुंबाचा कर्ता सुरक्षित रहावा, यासाठी कोळी भगिनी नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पुजा करुन त्याला साकडे घालत असतात. ( Narali Poornima Festival Information Traditions Significance In Marathi Kolibandhav and Narli Purnima )

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या


Previous Post

भटक्या श्वानांच्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी, वडगाव येथील घटना, स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण । Vadgaon Maval

Next Post

चाकण : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Chakan To avoid traffic congestion immediately construct roads in area after removing encroachments Ajit Pawar

चाकण : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

May 5, 2026
crime-arrested

गांजा विक्री प्रकरणी एकाला रंगेहात अटक, एका महिलेवर देखील गुन्हा दाखल

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.