Dainik Maval News : “कार्यकर्त्याला आपल्या भावासारखा जपला पाहिजे, टाळी द्या पण फक्त भाजपच्याच कार्यकर्त्याला द्या” असा जाहीर सल्ला भाजपाचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे यांनी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना दिल्यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
काकडे पुढे बोलताना म्हणाले की, मावळात बाळाभाऊंचे काम चांगले असूनही त्याची जाहिरात करण्यास आपण कमी पडलो, असे सांगत काकडे म्हणाले की, ‘निवडणुकीत भाजपला का मतदान करायचे, याचे कारण केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. तुमच्या-आमच्या ज्या चुका झाल्या आहेत, त्या स्वीकारून पुढे जायचे आहे. काही काळ आत्मविश्वास हरवल्यासारखे वाटत होते. मात्र,आपल्या उणिवा शोधून त्यावर काम केले पाहिजे,’ असेही काकडे यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी एका कार्यक्रमात टाळी मागितली आणि बाळा भेगडे यांनी त्यांना लगेच दिली, हा संदर्भ घेऊन काकडे यांनी जाहीर सल्ला दिल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तळेगाव दाभाडे येथील आयोजित संकल्प मेळाव्यात काकडे बोलत होते.
मावळ तालुक्यातील पक्षाच्या संघर्षाच्या काळाची आठवण करून देताना काकडे यांनी तळेगाव एमआयडीसीची उभारणी, १०० कोटी रुपयांचा देहूरोड-निगडी रस्ता तसेच तळेगाव-चाकण परिसरातील एमआयडीसी व डिफेन्स हबसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या २०० कोटी रुपयांच्या निधीचा उल्लेख केला. कार्यकर्त्यांचे संरक्षण करणे ही पक्षाची जबाबदारी असल्याचे सांगत तळेगावमध्ये कोणाचीही दादागिरी चालू दिली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
कामशेत परिसरातील ‘एमडी’ ड्रग्ज प्रकरणाचा उल्लेख करून तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अमली पदार्थ माफियांवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईचेही त्यांनी कौतुक केले.क्रमाच्या शेवटी आयोजकांकडून भोजनव्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी मावळ तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली
– मावळ तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात ; भव्य बाईक रॅली, आदिवासी पारंपारिक नृत्य ठरले आकर्षण
– ३५ दिवसांच्या प्रवासानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूगावात परतली ; भाविकांकडून उत्साहात स्वागत
